नवी दिल्ली : धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार याबाबत दोन्ही गटामध्ये संभ्रम आहे. तर दुसरीकडे यावरुन संघर्ष सुरु राहिला तर हे चिन्ह गोठवले जाण्याची देखील शक्यता आहे. आज यावर निर्णय येणे अपेक्षित होते. पण 'आमचे म्हणणे ऐकून घेतल्या शिवाय कोणताही निर्णय घेऊ नये असा अर्ज ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केला होता. त्यावर आता निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला महत्त्वाचे आदेश दिले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धनुष्यबाण चिन्हा संदर्भात म्हणणे मांडण्याचे निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना आदेश दिले आहेत. ठाकरे गटाने उद्या दुपारी २ वाजेपर्यंत म्हणणे मांडावे असं या आदेशात म्हटलं आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला पत्र पाठवले आहे. निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा संदर्भ दिला आहे. पोटनिवडणूक असल्यामुळे चिन्हावर तोडगा  काढला जाणार आहे. यापूर्वी एकनाथ शिदे  (CM Eknath Shinde) यांनी देखील धनुष्यबाण चिन्हावर दावा केला आहे.


अंधेरी पोटनिवडणुकीआधी यावर निर्णय होणं अपेक्षित आहे. शिंदे गटाने देखील धनुष्यबाण चिन्ह ठाकरे गटाला मिळू नये म्हणून तयारी केली आहे. धनुष्यबाण चिन्हाचा निकाल लावावा नंतर इतर मुद्द्यांवर सुनावणी घ्यावी. ठाकरे गटाकडून धनुष्यबाण चिन्हाचा गैरवापर केला जातोय. असा निवडणूक आयोगाला सादर केलेल्या पत्रात शिंदे गटाने दावा केलाय.


शिंदे गटाचा आरोप


उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकही कागदपत्र सादर केलेले नाही. त्यामुळं ठाकरे गट जाणून बुजून वेळ काढत असल्याचा शिंदे गटाचा आरोप आहे. आमदार, खासदार, जिल्हा प्रमुख, राज्य प्रमुख, मूळ सदस्य, पदाधिकारी आपल्या बाजूने आहेत. याबाबतची आकडेवारी शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे दिली आहे.


निवडणूक आयोगानं वारंवार मुदत दिली तरीही गटाने एकही पुरावा सादर केला नाही. निवडणूक आयोगाचा मान राखला जात नाही. असा दावा देखील शिंदे गटाने केला आहे.