मुंबई : गांधीवादाने कायम या देशाची आणि महाराष्ट्राची फसवणूक केली आहे, असं वादग्रस्त वक्तव्य अॅड गुणरत्न सदार्ते (Adv Gunratna Sadavarte) यांनी केलं आहे. तसंच  देशात एक मोठं षडयंत्र रचण्याचा प्रयत्न गांधीवादी राजकारण्यांनी केल्याचा आरोपही सदावर्ते यांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी त्यांनी नथुराम गोडसे याचा उल्लेख सदावर्ते यांनी नथुरामजी गोडसे असा केला. महात्मा गांधी यांनी अखेरचा श्वास घेताना 'हे राम' म्हटलं असं सांगण्यात येतं. पण ज्यावेळी नथुरामजी गोडसे यांची कोर्टात ट्रायल झाली त्यावेळी नथुरामजी गोडसे यांनी गांधीजींनी 'हे राम' म्हटलं नव्हतं असं सांगितलं, ही वस्तूस्थिती कायम लपवण्यात आल्याचं सदावर्ते यांनी सांगितलं. 


एसटी कामगार संघटनेची स्थापना
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आज 'एसटी कष्टकरी जनसंघ' या संघटनेची स्थापना केली. यावेळी सदावर्ते यांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. आज आमच्या नव्या संघटनेची घोषणा करतं आहोत, आमचे कार्यकर्ते असणार नाहीत तर ते प्रचारक असतील. ते राज्यांत जाऊन प्रचार करण्याचा प्रयत्न करतील. एसटी कष्टकरी जनसंघाचे प्रचारक आगामी निवडणुकीत प्रत्येक वॉर्ड मध्ये जाऊन प्रचार करतील अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.


सदावर्ते यांना जावं लागलं होतं तुरुंगात
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी घुसून एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं होतं. या आंदोलकांना भडकावल्याचा आरोप सदावर्ते यांच्यावर होता. याप्रकरणी सदावर्ते यांना जेलमध्येही जावं लागलं होतं. 26 एप्रिलला सदावर्ते यांना जामीन मिळाला. 


सक्रीय राजकारणात प्रवेश?
बाहेर आल्यानंतर सदावर्ते यांनी पुन्हा सरकारविरोधी भूमिका घेतली आहे.  सदावर्ते यांनी कायमच शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवार यांनी एसटी कामगारांचं नुकासन केलं असा गंभीर आरोपही सदावर्ते यांनी केला होता. सदावर्ते लवकरच सक्रिय राजकारणातही प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.