मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी मुंबईत राजभवनवर राज्यपालांची भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी राजू शेट्टी यांच्या तब्येतीची विचारपूस केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजू शेट्टी यांनी राज्यपालांना शेतकऱ्यांच्या मागण्यांचं निवेदन  दिले. त्यानंतर आत्मक्लेश यात्रेचा समारोप झाला. 


दरम्यान राजू शेट्टी यांनी सरकारला एक महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे. एक महिन्यात कर्जमाफी झाली नाही तर कार्यकारीणीची बैठक घेणार आहे. त्या बैठकीत भाजपाबरोबर रहायचे की नाही हे ठरवणार, असल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं.