मुंबई : समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी शिवसेनेचं कौतकु केलं आहे. तसेच महाराष्ट्र बंद करण्याची ताकत फक्त शिवसेनेकडेच आहे, अशी कबुलीही दिली आहे. मात्र शिवसेनाच आता सत्तेत आहे, शिवाय मुख्यमंत्रीही शिवसेनेचाच आहे, त्यामुळे राज्यात शांतता नांदेल आणि राज्याचा विकास होईल, असं अबू आझमी यांनी म्हटलं आहे. हे सरकार ५ वर्षे चालावं असा आमचाही प्रयत्न असेल, असंही त्यांनी यावेळी पत्रकारांना सांगितलं.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात, लवकरच खातेवाटप 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर दुसरीकडे महाराष्ट्र विकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, येत्या एक ते दोन दिवसांत खाते वाटप होणार असल्याची माहिती दिली आहे. खातेवाटपाला उशीर होत असल्यामुळे राज्याच्या विकासावर त्याचा कोणताही परिणाम होऊ देणार नाही. 


कारण सर्वजण जबाबदारीनं एकत्रीतपणे काम करत आहोत, अशी माहिती त्यांनी दिली. विशेष अधिवेशन संपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.