मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर सुरु असलेल्या वादात आता महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी उडी घेतली आहे. याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र पोलिसांऐवजी केंद्रीय यंत्रणांकडून तपास करण्याची गरज व्यक्त केली आहे. फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण CBI विभागाकडे सोपवण्यात यावा, अशी भावना मोठ्याप्रमाणावर सामान्यांमध्ये आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिया चक्रवर्तीचे सुशांतच्या वडिलांवर गंभीर आरोप


परंतु, राज्य सरकार त्यासाठी तयार नाही. राज्य सरकारची ही आडमुठी भूमिका पाहता किमान सक्तवसुली संचलनालयाला ED याप्रकरणात गुन्हा दाखल करण्याची परवानगी मिळावी. कारण या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार आणि खंडणीखोरीचा पैलू समोर आला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. 



रियावर जादूटोण्याचा पगडा; चौकशीतून धक्कादायक माहिती उघड

तर दुसरीकडे भाजप नेते आशिष शेलार यांनीही सुशांत सिंह मृत्यूप्रकरणाचा तपास योग्य रितीने सुरु नसल्याचा आरोप केला आहे. केवळ संशयितांच्या नावाची चर्चा सुरु आहे, त्यांची चौकशी होत नाही. त्यामुळे या प्रकरणाता तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी आपण राज्याच्या गृहमंत्र्यांकडे करणार असल्याचे शेलार यांनी सांगितले. यासाठी आशिष शेलार आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भेट घेणार आहेत. 


जुन महिन्यामध्ये १४ तारखेला मुंबईतील राहत्या घरी सुशांतनं आत्महत्या केली. तेव्हापासून त्याच्या आत्महत्या प्रकरणीचे अनेक धागेदोरे समोर येऊ लागले आहेत. अनेक अंगांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचं काम मुंबई पोलिसांनी हाती घेतले आहे. त्यातच सुशांतच्या कुटुंबीयांनी आता त्याची कथित प्रेयसी रिया चक्रवर्ती हिच्याविरोधात पाटणा येथे तक्रारही दाखल केली. याच तक्रारीच्या धर्तीवर रियानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेत सर्वप्रथम या तक्रारीला पाटण्याहून मुंबई पोलिसांकडे हस्तांतरित करण्याची मागणी केली.