मुंबई : उद्धव ठाकरेंचं सरकार जम्बो मंत्रिमंडळ असणारं सरकार आहे. कारण एकूण ३६ मंत्री शपथ घेणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्याच होणार आहे. उद्या मंगळवारी दुपारनंतर विस्तार होणार आहे. उद्या तिन्ही पक्षांचे एकूण ३६ मंत्री शपथ घेणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यात काँग्रेसचे १०, शिवसेना १३ आणि राष्ट्रवादीचे १३ सदस्य मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. काँग्रेसच्या यादीवर आजच शिक्कामोर्तब होणार असल्यामुळे उद्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.


यापूर्वी ६ मंत्र्यांना शपथ देण्यात आली होती, त्यात राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस पक्षाचे प्रत्येक २ जणांना शपथ देण्यात आली होती. नियमानुसार मंत्रिमंडळात किमान १२ तरी मंत्री असावेत अशी टीका विरोधकांकडून सरकारवर होत होती. मात्र महाराष्ट्र विकास आघाडीचं गाडं मंत्रिमंडळ विस्तारावर रखडलेलं होतं. अखेर उद्या एकूण ३६ मंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे.