बरनाल : भारत देश हा अनेक रहस्य असलेल्या गोष्टींशी भरलेला आहे. अशीच एक रहस्यमय घटना पंजाबमधून समोर आली आहे. जेव्हा कोरड्या झालेल्या तलावाची खोली वाढवण्याचं काम सुरु होतं तेव्हा तलावात आठ पायऱ्या आणि त्यानंतर पुढे एक भुयार सापडली. भुयारात एक मटका देखील सापडला.


गावकऱ्यांचं म्हणणं आहे की, या जागेचा धार्मिक संबंध असला पाहिजे. याआधी येथे एक मातीचा डोंगर होता. जो पाण्याखाली कधीच गेला नाही. अनेकदा तलावातून पाणी ओव्हर फ्लो देखील झालं. भुयाराची माहिती आजुबाजुच्या गावात कळताच ते पाहण्यासाठी लोकांनी येथे मोठी गर्दी केली आहे.