इस्लामाबाद : भारतीय लष्कराने नियंत्रण रेषा ओलांडत पिओकेमध्ये केलेल्या सर्जिकल स्टाईकला पुढीलवेळी उत्तर देऊ असे उद्धट उत्तर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताच्या कारवाईमुळे हादरलेल्या पाकिस्तानने परस्परविरोधी विधाने करण्यास सुरुवात केली आहे. भविष्यात अशा प्रकारे भारताकडून करण्यात येणाऱ्या हल्लयांना आमचे सैन्य चोख उत्तर देईल, असे ख्वाजा म्हणालेत. 


पाकिस्तानी सैन्य यासाठी तयार असून यापुढे भारत आमच्या प्रदेशात येऊन कारवाया करु शकरणार नाही, असे पाकिस्तानचे संरक्षणमंत्री आसिफ म्हणालेत. दरम्यान, भारताच्या कारावाईचे जगातील अनेक देशांनी स्वागत केले आहे.