इस्लामाबाद : जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद याने, भारताला धडा शिकवण्यासाठी काश्मीरमध्ये सैन्य घुसवा, असं म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचारात अनेकांना जीव गमवावा लागत आहे. यामुळे भारताला धडा शिकवण्यासाठी काश्मीरमध्ये सैन्य घुसवा, असे सईदने म्हटले आहे.


पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल राहील शरीफ यांना उद्देशून, मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सईद याने वक्तव्य केल्याचे पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांनी म्हटलंय.
 
हिज्बुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुऱ्हाण वणीने काही दिवसांपूर्वी मला दूरध्वनी केला होता. माझं तुमच्याशी बोलणे व्हावे ही शेवटची इच्छा होती. ती इच्छा पुर्ण झाली असल्याने मी शहीद होण्यासाठी तयार आहे', असेही सईदने म्हटले होते.


सईदने जुलैमध्येच भारताला हल्ल्याची धमकी दिली आहे. काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी भारताने गिलानीच्या ४ मागण्या मान्य कराव्या अन्यथा भारतापुढे युद्ध हा शेवटचा पर्याय असेल', असंही सईद बडबडलाय.