मुंबई : बॉलिवूडमधलं 'आदर्श जोडपं' म्हणून ओळखलं जाणारं आणखी एक जोडी वेगवेगळे मार्ग शोधतेय असं दिसतंय. हे जोडपं म्हणजे दुसरं तिसरं कुणी नसून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याचं कारण म्हणजे, नुकत्याच झालेल्या 'सरबजीत' या सिनेमाच्या प्रिमिअरवेळी या दोघांत सार्वजनिक ठिकाणी दिसून आलेला मनमुटाव... 


ओमंग कुमार दिग्दर्शित 'सरबजीत'च्या प्रिमिअरसाठी ऐर्श्वर्या आपल्या आई-वडील, सासू-सासरे भाऊ आणि पती अभिषेकसह दाखल झाली होती. 


नेमकं काय घडलं... 


ऐश्वर्या खूपच एक्सायटेड दिसत होती. पण, यावेळी अभिषेक मात्र फारसा खूश दिसत नव्हता. त्यानं ऐश्वर्यासोबत फोटो काढणंही टाळलं. पण जेव्हा पत्रकारांनी या जोडप्याला एकत्र फोटो काढण्याची विनंती केली तेव्हा अभिषेक ऐश्वर्याच्या बाजुला उभा राहिला मात्र एक-दोन फोटो काढल्यानंतर तो ऐश्वर्याचा हात सोडून स्टेजवरून निघून गेला... ऐश्वर्यासाठी हे अनपेक्षित होतं.


ऐश्वर्यानं कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी तिच्या चेहऱ्यावरून आणि तिच्या देहबोलीवरून याबद्दल नाराजी स्पष्ट दिसून आली. त्यानंतर हसतच ऐश्वर्यानंही 'नमस्कार' करून स्टेजवरून काढता पाय घेतला.  


त्यामुळेच, आता या जोडप्यातला वाद म्हणजे पेल्यातलं वादळ ठरतंय की वादळाची सुरूवात, याबद्दल चर्चा सुरू झालीय.