मुंबई : गणपती बाप्पा घराघरांमध्ये विराजमान झाले आहेत. बाप्पांचं दर्शन घ्यायला जवळपास प्रत्येक जण त्यांच्या मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या घरी जातात. बाप्पांच्या दर्शनाला जात असताना प्रसाद म्हणून मिठाई घेऊन भक्त जातात. या भक्तांना बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारनं आगळा वेगळा सल्ला दिला आहे. 


गणपतीनिमित्त कोणाच्याही घरी जाताना मिठाईचा प्रसाद घेऊन जाऊ नका. त्या प्रसादाऐवजी वह्या घेऊन जा. या वह्या नंतर एखाद्या महापालिकेच्या शाळेला दान करता येतील असं अक्षय कुमार म्हणाला आहे.