मुंबई : कोकणातील वाडा, वाड्यात घडणाऱ्या गूढ गोष्टी, त्यामागचे रहस्य याकथानकाभोवती फिरणारी मालिका रात्रीस खेळ चाले नुकतीच बंद झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अखेरच्या भागापर्यंत या मालिकेने गुन्हेगार कोण हा सस्पेंस कायम ठेवला. मात्र शेवटचा भाग उत्सुकतेने पाहणारे प्रेक्षक मात्र नाराज झाले. शेवटचा भाग प्रदर्शित झाल्यानंतर अनेक प्रेक्षकांनी या भागाबद्दल नाराजी व्यक्त केली.


तसेच मालिकेत घडत असलेल्या गोष्टींबद्दल अनेक प्रश्नही अनुत्तरित राहिलेत. अनुत्तरित राहिलेले प्रश्न 
1. पांडू दागिने आणि पैसे झाडाजवळ लपवत होता ते काय होतं
2. बाहुली जी झाडावर लटकवली होती ती विश्वासराव पोहोचती करणार होता त्याचं काय झालं
3. आई एकदम बरी कशी झाली आणि अण्णा अचानक दिसेनाशे कसे झाले
4. विष नक्की कोणी दिलं
5. सुषमाबद्दलचा कोणताही उलगडा झाला नाही
6. विश्वासराव नुसतेच आरोप करत राहिला... नक्की कोणी काय केले हे बहुतेक त्याला ही कळले नाही
7. मालिकेच्या पहिल्या भागापासूनचे अदभुत रहस्य अण्णा कसे वारले?
8. गणेशला वाड्याबाहेर का बसवून ठेवले, तो कुठे पळून गेला होता