मुंबई: सलमान खान आणि संजय दत्त यांच्या मैत्रीमध्ये गेल्या काही दिवसांपासून दुरावा निर्माण झाला आहे. एकेकाळी मित्र असलेल्या या दोघांमध्ये वाद निर्माण का झाला याचं कारण आता पुढे आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दोघांमध्ये दुरावा निर्माण होण्यामागे सलमानची मॅनेजर रेश्मा शेट्टी कारणीभूत असल्याची बातमी स्पॉटबॉयनं दिली आहे. 2014 ला संजय जेव्हा पॅरोलवर सुटला तेव्हा सलमाननं संजयला रेश्माला मॅनेजर ठेवण्याचा सल्ला दिला. 


अनेक वादांनंतर सलमानचं करिअर पुन्हा ट्रॅकवर आणण्यात रेश्माचा महत्त्वाचा वाटा आहे. संजय दत्तची प्रतिमाही डागाळल्यामुळे सलमाननं त्याला हा सल्ला दिला होता.


या सल्ल्याप्रमाणे संजय दत्तनं रेश्मा शेट्टीची मॅनेजर म्हणून नियुक्ती केली. पण त्यानंतर कोणतंही काम न मिळाल्यामुळे संजय दत्तनं विचारणा केली, तेव्हा संजयचं मानधन मोठ्या प्रमाणावर वाढवल्याचं संजय दत्तला कळलं. मानधन वाढवल्यामुळे संजय दत्त ऐवजी निर्माते दुसऱ्या कलाकाराला पसंती देऊ लागले. यामुळे संजय दत्तनं रेश्माची मॅनेजर म्हणून हकालपट्टी केली. 


या सगळ्या प्रकारामुळे सलमान खान नाराज झाला. संजय दत्तनं मात्र सलमानपुढे आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला, याचा सलमानवर काही परिणाम झाला नसल्याचं बोललं जात आहे.