औरंगाबाद : औरंगाबादेत आज मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक होती, तेव्हा विनाअनुदानित शिक्षकांनी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोर्चातील काही लोकांकडून दगडफेक करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर पोलिसांनी लाठीमार केल्याचं सांगण्यात येत आहे, पोलिसांच्या लाठीमारात दोन विनाअनुदानित शिक्षक जखमी झाले आहेत.


पोलिसांनी का अचानक लाठीमार केला हे लक्षात आलं नसल्याचं काही शिक्षकांनी म्हटलं आहे, महिला शिक्षकांनाही लाठीमार केला असल्याचं सांगण्यात येत आहे.


दगडफेकीत पोलिसही किरकोळ जखमी झाले असल्याचं सांगण्यात येतंय. या प्रकरणी ९ ते १० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.