पिंपरी, पुणे : विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेला उत्तर म्हणून महाराष्ट्रात संवाद यात्रा काढण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यात्रेत 25 लाख शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा मुख्यमंत्र्यांचा मानस आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये भरलेल्या प्रदेश भाजपा कार्यकारिणी बैठकीत समारोपाच्या भाषणात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. त्यावेळी संवाद यात्रेची घोषणा केली.


सत्ता हाती आली तरी जनतेशी नाळ तुटू देऊ नका, असा सल्लाही मुख्यमंत्री भाजपाच्या कार्यकर्त्यांना दिलाय. आपण भरताप्रमाणे सत्ता सांभाळतोय, खरं राज्य जनतेचं आहे, असं फडणवीस म्हणाले. सत्तापरिवर्तन झालं आता समाज परिवर्तनाची वेळ आल्याचं त्यांनी म्हटले.