पुणे : आषाढी वारीसाठी तुकोबांची पालखी देहूमधून 16 जूनला प्रस्थान ठेवणार आहे... तर 17 जूनला माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे.


 ज्ञानेश्वर महाराज देवस्थान समिती कडून पालखी सोहळ्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय. परंपरेनुसार ज्येष्ठ वद्य अष्टमीला म्हणजेच १७ जूनला ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीच प्रस्थान होणार आहे. 
 
 सतरा-अठरा दिवसांची पायी वारी करत तुकोबांची आणि माऊलींची पालखी 4 जुलैच्या आषाढी एकादशीसाठी पंढरपुरात दाखल होणार आहेत.