नवी दिल्ली : राज्यात पहिल्या टप्प्यात झालेल्या 147 नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपनं जोरदार मुसंडी मारली आहे. 22 नगरपालिकांवर भाजपने झेंडा फडकविला आहे तर एकूण 51   ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष निवडून आणले आहेत. भाजपच्या या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला यशस्वी केल्याबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेचे आभार. भाजपच्या विकास आणि गरिबांबद्दल असलेल्या भूमिकेमुळे भाजपचा विजय झाला असल्याचं ट्विट नरेंद्र मोदींनी केलं आहे.


भाजप कार्यकर्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी केलेल्या कामामुळे नागरिकांनी भाजपवर विश्वास दाखवल्याचंही पंतप्रधान म्हणाले आहेत.