पनवेल : दिलेला शब्द न पाळणं ही भाजपची संस्कृती आहे. शेतकरीच आता सरकारला जागा दाखवेल, अशी टीका शरद पवारांनी भाजपवर केली आहे. कर्जमाफीसाठीचं आंदोलन आता थांबणार नाही, असंही पवार म्हणालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतकरी आत्महत्येबाबत लाज वाटली पाहिजे. उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली मग महाराष्ट्रात कधी होणार असा सवाल पवारांनी उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या न करण्याचं आवाहनही पवार यांनी केलं.


शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांनी काढलेल्या संघर्ष यात्रेची आज पनवेलमध्ये सांगता झाली. यावेळी बोलताना शरद पवारांनी शेतकऱ्यांना धीर देताना सरकारवर टीका केली.