मुंबई : उन्हाची वाढती काहीली बघता यंदा मान्सून लवकर येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतो आहे. एप्रिल महिन्यातच राज्यात पारा रोज नवे उच्चांक गाठताना दिसतो आहे. मान्सूनचं आगमन हे जमीन आणि समुद्र या दोन्हीकडे असणाऱ्या तापमानानवर अवलंबून असंत.


यंदा जमीन आणि समुद्र दोन्हीकडे पारा सारख्याच प्रमाणात वाढतोय.. त्यामुळे यंदा पावसाळा लवकर सुरू होईल अशी चर्चा सध्या हवामान तज्ज्ञांमध्ये सुरू आहे. पण अद्याप या चर्चेला कुठलाही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.