मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात आज सकाळी मळभ वातावरण आहे. मालाड, दहीसर, बोरिवली परिसरात पावसाच्या हलक्या सरी पडल्यात. याचा फटका पश्चिम रेल्वेला बसलाय. पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बोरिवलीत तांत्रिक बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेच्या लोकलवर परिणाम झाला आहे. सकाळी पडलेल्या पावसाच्या हलक्या सरींमुळे बोरिवलीत वीजवाहक यंत्रणेत बिघाड झाला आहे. त्यामुळे विरारहून चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकल सेवेवर परिणाम झाला आहे.


सकाळी ऑफिसला जाणाऱ्यांची गर्दी पाहता हा बिघाड त्वरीत दुरुस्त न झाल्यास याचा फटका कर्मचाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. तसेच स्टेशनवरील गर्दी वाढण्याची शक्यता आहे. अंधेरी, मालाड, दहीसर, बोरिवली या ठिकाणी हलका पाऊस झाला.


दरम्यान, कोकणात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्यात. रत्नागिरी, संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथे पाऊस झाला.