मुंबई : दुष्काळाच्या परिस्थितीत राज्यात आयपीएलचे सामने खेळवण्याबाबत न्यायलयात सुनावणी सुरु असताना यंदाच्या हंगामातील पाच सामने राज्याबाहेर हलवण्यात येणर असल्याचे संकेत आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्लांनी दिलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता बीसीसीआय राज्यातील पाच सामने हलवण्याबाबतचा प्रस्ताव न्यायालयात ठेवणार असल्याचे राजीव शुक्लांनी सांगितल्याचे लोकमतचे वृत्त आहे. यामध्ये नागपूरच्या जामठा मैदानावरील ३ आणि पुण्यातील २ सामन्यांचा समावेश आहे. 


पुण्यात २५ आणि २७ मेला होणारे प्लेऑफ सामने हलवण्यात येणार आहेत तसेच व्हीसीए मैदानावर होणारे पंजाबचे सामने मोहालीला खेळवण्यात येण्याची शक्यता असल्याचेही ते म्हणाले.