तेहरान : इराणमध्ये झालेल्या एशियन कबड्डी चॅम्पियनशिपमध्ये भारतीय टीमनं महिला आणि पुरुष गटाचं अजिंक्यपद पटाकवलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फायनलमध्ये भारतीय पुरुष टीमनं पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 36-22 नं पराभव केला. साखली सामन्यातही भारतीय टीमनं पाकिस्तानचा 44-18 नं धुव्वा उडवला होता. 


प्रदीप नरवाल, सुरेंदर नाडा, मनिंदर सिंग, अजय ठाकूर आणि संदीप नरवालनं भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.  तर महिला टीमनं कोरियावर 42-20 नं मात करत अजिंक्यपदावर आपलं नाव कोरलं. मुंबईकर अभिलाषा म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीयमहिला टीमनं हा विजय साकारला.