मुंबई : क्रिकेट जगतात खेळाडूंचे अनेक वाद होत असतात, मात्र या वादा दरम्यान अनेक मैत्रीचे क्षण देखील येतात. हे क्षण क्रिकेटच्या इतिहासातील मैत्रीचे सुवर्ण क्षण ठरतात. हे क्षण कॅमेऱ्यातही कैद होतात. हे क्षण कितीही जुने असले, तरी मैत्रीचे हे क्षण नवे नवे, आणि हवे हवेसे वाटतात. अनेक वेळा क्रिकेटच्या मैदानात हाणामाऱ्या होतात, हमरी तुमरीवर क्रिकेटर येतात, व्यवस्थापनाकडून त्यांना दंड देखील ठोठावण्यात येतो, मात्र क्रिकेटच्या मैदानातील मैत्रीचे हे क्षण काही और आहेत.