बंगळुरू : राजस्थान आणि बंगळुरु यांच्यात झालेल्या अटीतटीच्या टी-२० मॅचमध्ये राजस्थानने विजय मिळवला आहे. राजस्थानने बंगळुरुवर १९ रन्सने विजय मिळवला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंगळुरुतील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेली मॅच खूपच रंगतदार झाली. बंगळुरू घरच्या मैदानावर झालेल्या मॅचमध्ये बंगळुरुच्या टीमने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. 


यानंतर मैदानात बॅटिंगसाठी आलेल्या राजस्थानच्या टीमने २० ओव्हर्समध्ये ४ विकेट्स गमावत २१७ रन्स केले.


राजस्थानच्या टीमने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या बंगळुरुच्या टीमला २० ओव्हर्समध्ये १९८ रन्सपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे बंगळुरुचा १९ रन्सने पराभव झाला.