मुंबई : टीम इंडियाच्या कर्णधार विराट कोहलीला आराम देण्यात आला आहे.


विराटला आराम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

6 मार्च पासून बांगलादेश आणि श्रीलंका विरुद्ध होणाऱ्या टी-20 ट्राय सीरीजसाठी रोहित शर्माला टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या मोठ्या दौऱ्यानंतर BCCI ने काही खेळाडुंना आराम देण्याचा विचार केला आहे. ट्राय सीरीजमध्ये रविवारी संघाची घोषणा होऊ शकते.


टी-20 ट्राय सिरीज


भारत, बांग्लादेश आणि श्रीलंका यांच्यामध्ये ही टी-20 ट्राय सिरीज होणार आहे. ही टूर्नामेंट श्रीलंकेच्या 70व्या स्वतंत्रता दिवसाच्या पार्श्वभूमीवर खेळवली जाणार आहे. टूर्नामेंटमध्ये भारताचा पहिला सामना श्रीलंकेसोबत होईल. सर्व टीममध्ये 2 सामने होतील. एकूण 7 सामने खेळले जातील.