सेन्च्युरिअन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टला उद्यापासून सुरुवात होत आहे. केप टाऊनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा पराभव झाला होता. त्यामुळे सीरिजमधील आव्हान कायम ठेवण्यासाठी ही टेस्ट जिंकणं आवश्यक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरी टेस्ट सुरु होण्याआधी भारताचा कॅप्टन विराट कोहलीची डोकेदुखी मात्र वाढली आहे. या मॅचमध्ये कोणत्या खेळाडूंना संधी द्यायची याबाबत विराट कोहली अजूनही संभ्रमात आहे. पहिल्या मॅचमध्ये शिखर धवन अपयशी ठरला होता. त्यामुळे धवनऐवजी के.एल.राहुलला संधी देण्यात यावी अशी मागणी होते आहे.


शेवटच्या सरावानंतरच ओपनिंगला कोण खेळेल याबाबत निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया विराट कोहलीनं दिली आहे. पहिल्या टेस्टमध्ये भारतीय बॉलर्सनी उल्लेखनीय कामगिरी केली होती. पण बॅट्समनना मात्र फारसं यश मिळवता आलं नाही, असं कोहली म्हणाला.