Mobile Telicom Company देशात सध्या लोकसभेची धामधूम सुरु असून राजकीय वर्तुळात सर्वच पक्षांत  चढओढ सुरु आहे.  19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत 7 टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमिवर  मोबाईल रीचार्ज महागणार असल्याची माहिती समोर आली आहे. मोबाईल कंपन्या त्यांचे दर वाढणार असून ग्राहकांना याचा गंभीर फटका बसणार आहे.अँटिक स्टॉक ब्रोकिंगच्या अहवालानुसार, टेलिकॉम कंपन्यांनी 15 ते 17 टक्क्यांची दर वाढवणार असल्याचं समोर आलं आहे.  याचा मोबाईल कंपन्याना नफा झाला तरी ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे. टेलिकॉम कंपन्या बऱ्याच काळापासून दरवाढ करण्याच्या प्रतिक्षेत होते. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणूकीचा मुहूर्त साधत मोबाईल रिचार्ज वाढण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टेलिकॉम कंपन्यांनी तीन वर्षापूर्वी म्हणजेच डिसेंबर 2021मध्ये कोविडकाळात डिसेंबर 2021 मध्ये टेलिकॉम कंपन्यांनी तब्बल मोबाईल रिचार्जमध्ये तब्बल 20 टक्क्यांची दरवाढ केली होती. त्यानंतर आता तीन वर्षांनी 15 ते 17 टक्क्यांची दरवाढ करणार असल्याचे सांगितलं जात आहे.त्यामुळे आता 350 चा रिचार्जआता 400 रुपयांनी होणार असून 50 रुपयांनी रीचार्ज महाग होणार आहे.याचा सर्वाधिक फायदा हा एअरटेल कंपनीला होणार असल्याचं सांगितलं जातंय. गेल्या काही दिवसांत वोडाफोन आणि आयडीया कंपनीला कंपनीला आर्थिक संकटांना सामोरं जावं लागत आहे. 2023 मध्ये दोन्ही कंपनीला होणारा फायदा हा 37 टक्क्यांवरुन 19.3 टक्क्यांवर आला. त्याच्याच विरुद्ध आजच्या घडीला भारती कंपनीला 33 टक्क्यांचा नफा झाला आहे. 


 रीलायन्स जिओ येत्या काही दिवसात 895 रुपयांचा नवा प्लॅन घेऊन येत आहे. 365 या दिवसांच्या प्लॅनमध्ये 24gb  डेटा असणार आहे, त्याचप्रमाणे 28 दिवसांपर्यंत  2GB  हाय स्पीड डेटा , अनलिमिटेड कॉलिंग आणि 50 एसएमएस फ्री पॅक मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे जर तुम्ही जिओ युजर्स असाल आणि वर्षभराचा एकदाच करत असाल तर हा प्लॅन तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. जियो युजर्सची संख्या भारतात मोठ्या प्रमाणात आहे. या वाढलेल्या दरवाढीचा कोणत्या कोणत्या टेलिकॉम कंपनीला किती फायदा होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.