मोठी बातमी । 10 वी, 12 वीच्या परीक्षेबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड पाहा काय म्हणाल्या?

राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा (10th and 12th examination) सुरक्षित वातावरणात घेण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. 

Updated: Mar 17, 2021, 03:20 PM IST
मोठी बातमी । 10 वी, 12 वीच्या परीक्षेबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड पाहा काय म्हणाल्या?  title=
संग्रहित छाया

मुंबई  : राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा (10th and 12th examination) सुरक्षित वातावरणात घेण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन राज्यभर समान स्तरावर ऑफलाईन पद्धतीने परीक्षा (Exam) देण्यासाठी सज्ज होताना ('वी कॅन डू ईट ऑफलाईन एक्झाम') ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देण्यासंदर्भातील मोहीम राज्यभर राबविण्यात येणार आहे, असे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी सांगितले. तसेच लेखी परीक्षेनंतर प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा घेण्यात येणार आहेत.

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या परीक्षांबाबत चर्नी रोड येथील बालभवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, एसएससी मंडळाचे प्रकल्प समन्वयक दिनकर पाटील, एसईआरटीचे संचालक दिनकर टेमकर, उपसंचालक विकास गरड यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी आणि शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते. 14 मार्चपर्यंत शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप आटोक्‍यात आला नसल्याने शाळा आणखी काही दिवस बंदच ठेवण्यात येणार आहेत. बारावीची परीक्षा 23 एप्रिलपासून तर दहावीची परीक्षा 29 एप्रिलपासून सुरु होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर दहावी-बारावीचे वर्ग सुरु ठेवण्यात आले आहेत.

वर्षा गायकवाड म्हणाल्या, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे योग्य आहे. यासाठी शिक्षक प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देण्यासाठी प्रवृत्त करावे. सर्वांनी एकत्र येऊन शासनासोबत ही मोहीम यशस्वीपणे राबवून विद्यार्थ्यांची सकारात्मक मानसिकता तयार करण्यासाठी सहकार्य करावे. विद्यार्थ्यांची सुरक्षा, शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये आणि परिक्षेच्या पूर्वतयारीस वेळ मिळावा या सर्व बाबींचा विचार करून परीक्षेचे वेळापत्रक ठरविण्यात आले आहे. 

वेळापत्रकाबाबत आणखी काही सूचना असतील तर त्या सादर कराव्यात. त्याबाबत सल्लागार समितीशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. प्रॅक्टीकल परीक्षा, जनरल सादर करणे याबाबत संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एकसारखा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

सह्याद्री वाहिनीवर शासनामार्फत व्याख्यानमाला सुरू असून, परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी महत्त्वाचे प्रश्न, स्वाध्याय यासाठीही कार्यक्रम घेतले जातील असेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना सामान्यत: पडणाऱ्या प्रश्नांबाबत वेबसाईटवर लवकरच 'एफएक्यु' (FAQ) देण्यात येणार आहेत. ज्या निवासी शाळा बंद आहेत, त्या शाळेतील फक्त दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राहण्याची आणि परीक्षा देण्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असेही मंत्री वर्षा गायकवाड यांनी यावेळी सांगितले. 

https://zeenews.india.com/marathi/video/varsha-gaikwad-said-that-ssc-and...