भारत कधीही झुकणार नाही असं म्हणत Allu Arjun भावूक झाला...

 अल्लू अर्जुनला त्याच्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच हा मान मिळाला, त्यावर तो म्हणाला-

Updated: Oct 13, 2022, 08:18 PM IST
भारत कधीही झुकणार नाही असं म्हणत Allu Arjun भावूक झाला... title=
Allu Arjun gets emotional saying India will never bow down nz

Allu Arjun wins Indian of the Year:  'पुष्पा द राइज' (Pushpa: The Rise) या चित्रपटातील दमदार अभिनयाने  जगभरात खळबळ माजवणारा साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन  (Allu Arjun) नुकताच एका अवॉर्ड शोमध्ये त्या चित्रपटाबाबत खूप भावूक झाला आणि त्यावर त्याने भाष्य केले. त्यावरही त्याचे खूप कौतुक होत आहे. एका कार्यक्रमादरम्यान अल्लू अर्जुनला असा सन्मान देण्यात आला होता, तो सन्मान स्वीकारल्यानंतर त्यानं त्या भाषणात मन जिंकल्याबद्दल सांगितले होते. अल्लू अर्जुनला त्याच्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच हा मान मिळाला, त्यावर तो म्हणाला- 'भारत कधीच झुकणार नाही..' (Allu Arjun gets emotional saying India will never bow down nz)

आणखी वाचा - उर्फी जावेद पुन्हा त्याचाच प्रेमात? इन्स्टाग्रामवर उघड केलं प्रेम

अल्लू अर्जुनला हा मोठा मान मिळाला

आलेल्या माहितीनुसार, साऊथचा सुप्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन याला अलीकडेच नवी दिल्ली येथे 'पुष्पा' या चित्रपटासाठी 'इंडियन ऑफ द इयर 2022' (Allu Arjun Indian of the Year 2022) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळाल्यानंतर 'पुष्पराज' म्हणजेच अल्लू अर्जुन खूप भावूक झालेला दिसला त्यांचे हे भावनिक स्पीच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.

'भारत कधीच झुकणार नाही..' - अल्लू अर्जुनचे चित्रपटसृष्टीवरील भावनिक भाषण

अल्लू अर्जुनने सांगितले की, तो गेल्या 20 वर्षांपासून अभिनय करत आहे, परंतु उत्तरेतील चित्रपटासाठी त्याला पहिल्यांदाच हा पुरस्कार देण्यात आला आहे. यामुळेच हा पुरस्कार मिळाल्यानंतर अल्लू अर्जुन भावूक झाला होता. आपल्या भाषणात तो म्हणाला- मला खूप आनंद आहे की आमच्यात फरक आहे... उत्तर आणि दक्षिणेसारखे... पण तुम्हाला माहिती आहे का या देशाचे सौंदर्य त्याच्या विविधतेत आहे. जेव्हा हा चित्रपट बनला तेव्हा संपूर्ण भारताने तो साजरा केला, म्हणून आपण सर्व भारतीय चित्रपटसृष्टीचे मुल आणि मुली आहोत.

आणखी वाचा - ही मालिका तब्बल 9 वर्षानंतर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला...

 

एवढंच नाही तर अल्लू अर्जुनने आपल्या प्रसिद्ध डायलॉगने भाषण केलं पण त्याला मोठा ट्विस्ट दिला. अल्लू अर्जुन म्हणाला - भारतीय सिनेमा... भारत कधीही झुकणार नाही.'