लग्नानंतरचा 'तो' दिवस आठवला की... 21 वर्षआंनंतर अरबाजचा मोठा उलगडा

मलायकासोबत घटस्फोट झाल्यानंतर अरबाजला आली त्या दिवसांची आठवण, 'मी 21 वर्ष प्रयत्न केला, पण...'  

Updated: Mar 23, 2022, 04:03 PM IST
लग्नानंतरचा 'तो' दिवस आठवला की... 21 वर्षआंनंतर अरबाजचा मोठा उलगडा  title=

मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा कायम प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. अनेकदा आपल्या हॉट आणि बोल्ड अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी मलायका पुन्हा चर्चेत आली आहे. सध्या रंगणाऱ्या चर्चांना कारण देखील अत्यंत खास आहे. प्रसिद्ध अभिनेत्री आणि अरबाज खानची पहिली पत्नी मलायका अरोरा आज वेगळे झाले असले तर एका कारणासाठी कायम एकत्र असातात. 

अरबाज-मलायकाचं  एकत्र येण्याचं कारण म्हणजे त्यांचा मुलगा अरहान खान. विभक्त झाल्यानंतर मलायका आणि अरबाज कितीही व्यस्त असले तरी मुलासाठी भक्कम उभे असतात. जेव्हा मलायका आणि अरबाजने विभक्त होण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्क बसला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

एका मुलाखतीत अरबाज घटस्फोटावर मोकळेपणाने बोलला, 'काही व्यक्ती आयुष्यात प्रत्येक गोष्टीत तडजोड करतात. मग ती गोष्ट करियरमध्ये असो किंवा नात्यामध्ये... जर तुम्ही अशा लोकांना विचारलं तुम्हाला आयुष्यात काही नकोय का? तर त्यांचं उत्तर हो असेल...'

अरबाज पुढे म्हणाला, 'मी आनंदी आहे. मी 21 वर्ष नातं टिकवण्यासाठी प्रयत्न केला. पण मी अयशस्वी ठरलो. मी नातं वाचवण्यासाठी प्रयत्न तरी केला, पण काही तेवढं देखील करत नाही...'

मलायका आणि अरबाजच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, लग्नाच्या 21 वर्षांनंतर दोघांनी वेगळ राहाण्याचा निर्णय घेतला. आता दोघांचे मार्ग वेगळे झाले आहेत. मलायका अभिनेता अर्जुनसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत.