सलमानला कधीचं ऐश्वर्यापासून दूर जायचं नव्हतं, पण...

ऐश्वर्याला सोडण्याची सलमानची कधीचं नव्हती इच्छा... पण 'तो' एक क्षण ज्यामुळे भाईजान राहिला एकटा  

Updated: Feb 18, 2022, 03:59 PM IST
सलमानला कधीचं ऐश्वर्यापासून दूर जायचं नव्हतं, पण... title=

मुंबई : प्रेम ही एक अशी भावना आहे, ज्यामुळे माणसाला आनंद मिळतो, पण तेच प्रेम जण आपल्यापासून दूर झालं, तर वाट्याला येणार एकटेपण हे अत्यंत त्रासदायी ठरतो. दिग्दर्शक संजय लिला भंसाळी यांच्या 'हम दिल दे चुके' सिनेमात अशी वेळ अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या यांच्यावर येते. 'हम दिल दे चुके' सिनेमाची कथा नंदिनी, समीर आणि वनराज यांच्या भोवती फिरताना दिसते.

सिनेमा रुपेरी पडद्यावर दाखल झाला आणि खरं प्रेम कोणावर केलं जातं... याचा प्रत्येय प्रेक्षकांना आला. सिनेमाला अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आलं. अनेकांच्या मनात घाव केलेल्या सिनेमाची कथा सलमानच्या पसंतीस पडली नव्हती. 

सिनेमात सलमान आणि ऐश्वर्या एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात. पण कुटुंबाला त्यांचं प्रेम मान्य नव्हतं. त्यामुळे कुटुंब ऐश्वर्या म्हणजे नंदिनीचं लग्न वनराजसोबत (अजय देवगण) करून देतात.

सलमान खानकडून ऐश्वर्या रायचा छळ, भाईजानच्या जवळच्या व्यक्तीचा खुलासा

लग्नानंतर देखील ऐश्वर्याचं सलमानसोबत असलेलं प्रेम कमी होत नाही. नंतर अजयला सत्य कळाल्यानंतर तो सलमान आणि ऐश्वर्याला एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. 

पण अखेर एक भारतीय महिलेप्रमाणे ऐश्वर्या अजयकडे येते आणि सलमान एकटा राहातो. सिनेमाच्या शेवटी ऐश्वर्या आपल्याकडे यावी अशी मागणी त्याने भंसाळी यांच्याकडे केली. 

यामुळे सलमान आणि भंसाळी यांच्यात अनेक वाद झाले. पण भंसाळी यांनी सलमानची अट मान्य केली नाही. अखेर त्यांनी वनराज आणि नंदिनीला एकत्र आणत सिनेमाचा हॅप्पी एन्डिंग झाली.