बच्चन कुटुंबातील वादामागचं सत्य समोर; खरंच सोडलं आराध्या-ऐश्वर्याने बीग बींच घर?

गेले अनेक दिवसांपासून बच्चन कुटूंबातील वाद सतत चर्चेत आहे. असंही म्हटलं जातंय की, ऐश्वर्या-अभिषेकमध्ये दुरावा आला आहे. मात्र आज आम्ही तुम्हाला यामगचं सत्य सांगणार आहोत. 

Updated: Jan 21, 2024, 10:10 AM IST
बच्चन कुटुंबातील वादामागचं सत्य समोर; खरंच सोडलं आराध्या-ऐश्वर्याने बीग बींच घर?  title=

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून बच्चन कुटूंब वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. बऱ्याच दिवसांपासून मीडियामध्ये सातत्याने या कपलच्या दुराव्याच्या बातम्या समोर येत आहेत. बच्चन कुटूंब हे बॉलिवूडमधील सर्वात श्रेष्ठ कुटूंबापैकी एक आहे. नेहमीच हे सपुंर्ण कुटूंबच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. कधी ते त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात तर कधी ते त्यांच्या पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत असतात. गेल्या अनेक दिवसांपासून बच्चन कुटूंब चर्चेत आहे. तर दुसरीकडे ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन बॉलिवूडच्या फेमस कपलपैकी एक आहेत. ही जोडी सोशल मीडियावर कायमच चर्चेचा विषय असते. या जोडीचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. मात्र गेले दोन महिन्यांपासून या दोघांच्या विभक्त होण्याचा बातम्या समोर येत आहेत. 

या दिवसांत बच्चन परिवाराचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ऐश्वर्या राय बच्चनला घेवून दावा केला जात आहे की, अभिनेत्रीने बच्चन कुटुंबापासून दुरावली आहे. दोघांमध्ये गेल्या बऱ्याच दिवसांपासून दुरावा आला आहे. मात्र दुसरीकडे देशभरात पसरत असलेल्या बातम्यापाहून ऐश्वर्या खूप हैराण झाली आहे.

हे यासाठी कारण की, बच्चन परिवाराला एक आदर्श परिवाराच्या दृष्टीकोनातून चाहत्यांनी पाहिलं आहे आणि अशातच जेव्हा अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या बच्चनच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत मात्र आज आम्ही तुम्हाला आमच्या या रिपोर्टच्या माध्यमातून सत्य सांगणार आहोत की, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमागचं सत्य काय आहे?  

तर काही मीडियामध्ये असाही दावा केला गेला आहे की,  ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चनमध्ये दुराव्याचं कारण दुसरं तिसरं कोणी नसून ऐश्वर्या रायच्या सासू जया बच्चन असल्याचा दावाही अनेक माध्यमांमध्ये केला जात आहे. जया बच्चन यांचा कठोर स्वभाव या दोघांच्या दुराव्यामागचं कारण असल्याचं काही रिपोर्ट्समध्ये म्हणण्यात आलं आहे.
 
मात्र आज आम्ही तुम्हाला सांगतो की, सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या या सगळ्या बातम्या केवळ अफवा आहेत. या सगळ्या बातम्या खोट्या आहेत.  कारण अभिषेक आणि ऐश्वर्यामध्ये दुरावा आला नसून हे कपल एकमेकांसोबत खूप प्रेमाने राहत आहेत. या दोघांमध्ये सगळं काही ठिक चाललं आहे. इतकंच नाही तर गेल्या अनेक दिवसांपासून अशीही चर्चा होती की, ऐश्वर्याने तिचं सासर सोडलं होतं, तर आम्ही तुम्हाला सांगतो की, ही देखील एक अफवा आहे. ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन हे बच्चन कुटूबांसोबत एकाच घरात राहत आहेत आणि आजही अभिषेक आणि ऐश्वर्यामधील प्रेम कायम आहे.