जनतेसाठी पैसे खर्च करण्यासाठी भारत सरकारकडे पैसे कोठून येतात? यांचे मुख्य स्त्रोत काय आहेत?

 तुम्ही कधी विचार केला आहे की, सरकार एवढे पैसे कोठून आणते?

Updated: Oct 15, 2021, 05:13 PM IST
जनतेसाठी पैसे खर्च करण्यासाठी भारत सरकारकडे पैसे कोठून येतात? यांचे मुख्य स्त्रोत काय आहेत? title=

मुंबई : सरकार लोकांच्या भल्यासाठी अनेक पावले उचलत आहे. जनतेला रस्ता सुविधा पुरवण्यापासून ते संकटकाळात थेट पैशांची मदत देण्यापर्यंत सरकार लोकांना अनेक प्रकारे मदत करते. तुम्ही पाहिले असेल की, जेव्हा बजेट येते तेव्हा असे सांगितले जाते की, हजारो कोटींचे तपशील आहेत जे जनतेवर खर्च करावे लागतील. या ना त्या गोष्टीसाठी देखील सरकारकडून खर्च दाखवला जातो किंवा भविष्यात होणारा खर्च सांगण्यात येतो पण, तुम्ही कधी विचार केला आहे की, सरकार एवढे पैसे कोठून आणते? अशा परिस्थितीत, आज आपल्याला माहित आहे की सरकार किती पैसे कमवते.

भारत सरकार आपल्या एकूण कमाईच्या 62.87% कमाई इनडायरेक्ट टॅक्सद्वारे करते. या इनडायरेक्ट टॅक्समध्ये सर्विस, एक्साइज, वॅल्यू ऐडेड, कस्टम ड्यूटी आणि स्टांप ड्यूटीसेवा शुल्क इत्यादींचा समावेश आहे.

कॉर्पोरेट टॅक हा सरकारच्या उत्पन्नाचा दुसरा सर्वात मोठा स्त्रोत आहे. सरकारच्या एकूण महसुलात त्याचा वाटा 18.9%आहे.

यानंतर, सरकारचा तिसरा प्रमुख स्त्रोत आहे वैयक्तिक आणि इतर आयकर टॅक्स. सरकारच्या एकूण कमाईपैकी या टॅक्सद्वारे सरकारला 13.2% हिस्सा मिळतो.

भारत सरकारच्या उत्पन्नाचा चौथा सर्वात मोठा स्त्रोत म्हणजे मालमत्तेवरील टॅक्स. सरकारच्या एकूण कमाईमध्ये त्याचा हिस्सा 4.13%आहे.

सरकारच्या उत्पन्नाचा पाचवा स्रोत म्हणजे इतर टॅक्सेस आहे. या टॅक्समध्ये स्वच्छ भारत, इंफ्रास्ट्रक्चर, कृषि कल्याण सेस इ. एकूण कमाईमध्ये त्याचा वाटा 0.9%आहे.