INS Dhruv | न्यूक्लियर मिसाईलचा हल्ला नष्ट करणारे भारताचे पहिले जहाज समुद्रात उतरणार

 भारताकडे येणाऱ्या न्यूक्लियर मिसाईलला ट्रॅक करून त्यांना शत्रुच्या जमिनीवरच नष्ट करणारे जहाज आयएनएस ध्रुव लॉंच होणार आहे.

Updated: Sep 10, 2021, 10:13 AM IST
INS Dhruv | न्यूक्लियर मिसाईलचा हल्ला नष्ट करणारे भारताचे पहिले जहाज समुद्रात उतरणार title=

विशाखापट्टनम : भारताकडे येणाऱ्या न्यूक्लियर मिसाईलला ट्रॅक करून त्यांना शत्रुच्या जमिनीवरच नष्ट करणारे जहाज आयएनएस ध्रुव लॉंच होणार आहे. या जहाजाला विशेषतः चीन आणि पाकिस्तानच्या कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी तैनात करण्यात येणार आहे. दोन्ही देशांमध्ये न्यूक्लियर मिसाईल डागण्याची क्षमता आहे.

DRDO आणि NTRO च्या सहकार्याने हिंदुस्तान शिपयार्डद्वारे या जहाजाला बनवण्यात आले आहे. या जहाजाला नौदलाची सामरिक बल कमानद्वारे संचलित करण्यात येईल. लॉंचिंग कार्यक्रमात नौदल प्रमुख एडमिरल करमबीर सिंह आणि एनटीआरओचे अध्यक्ष अनिल दासमान उपस्थित राहणार आहेत.

भारत सहावा देश
न्यूक्लियर मिसाईल ट्रॅकिंग जहाज आपल्या नौदलात सामिल करणारा भारत सहावा देश असणार आहे. याआधी फ्रांस, अमेरिका, ब्रिटेन, रशिया आणि चीनकडे ही क्षमता आहे. हे जहाज फक्त शत्रुच्या न्यूक्लियर मिसाइलला ट्रॅक करेन, भारताकडे येणारी मिसालईल नष्ट करेल तसेच शत्रुचे सॅटेलाइट ट्रॅक करण्यासही सक्षम आहे.

आयएनएस ध्रुवचे वजन साधारण 10 टन आहे.  जहाजावर रडार ट्रॅनिंग एँटिना, एडवान्स इलेक्ट्रिक सिस्टिम असे आधुनिक उपकरणे आहेत.  चीनच्या हिंदी महासागरातील हालचाली वाढल्यानंतर आयएनएस ध्रुवचे लॉंचिंग महत्वाचे मानले जात आहे.