सेल्फीच्या फॅडनं घेतले दोन महिलांचे बळी!

ओडिसाच्या रायगढ जिल्ह्यात सेल्फीच्या फॅडनं दोन महिलांचे बळी घेतलेत. 

Updated: Oct 27, 2017, 08:56 PM IST
सेल्फीच्या फॅडनं घेतले दोन महिलांचे बळी! title=

कोरापूट : ओडिसाच्या रायगढ जिल्ह्यात सेल्फीच्या फॅडनं दोन महिलांचे बळी घेतलेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेल्फी घेता घेताच दोन महिला नदीत कोसळल्यामुळे पाण्यात बुडून मृत्यू झाला. 

दोन्ही महिला आंध्रप्रदेशच्या रहिवासी होत्या. विशाखापट्टनमची ई ज्योती (२७ वर्ष) आणि विजयनगरमची एस श्रीदेवी (२३ वर्ष) अशी त्या दोघींची ओळख पटलीय. 

विशाखापट्टनमहून आलेल्या नऊ महिला पर्यटकांच्या एका ग्रुपमध्ये त्या सहभागी होत्या. रायगढच्या बाहेरस्थित नागाबलीवर बनलेल्या एका झुलणाऱ्या पुलावर त्या फिरत होत्या. 

काही फोटो घेतल्यानंतर महिलांचा हा समुह आणखी फोटो घेण्यासाठी खाली नदीपात्रात पोहचल्या. परंतु, नदीत एका दगडावर उभ्या राहून पोझ देताना महिलांचा तोल गेला आणि त्या पाण्यात पडल्या. 

मदत यंत्रणेनं स्थानिकांच्या मदतीनं महिलांचे शव बाहेर काढले... आणि त्यानंतर या महिलांच्या कुटुंबांना संपर्क साधला गेला.