कोरोनाविरुद्धची लढाई सर्वांनी एकत्र लढूया, नियमांचे काटेकोर पालन करुया - सोनिया गांधी

 कोरोनाविरुद्धची लढाई सर्वांनी एकत्र लढलायची आहे, असे प्रतिपादन काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केले. 

Updated: Apr 14, 2020, 09:16 AM IST
कोरोनाविरुद्धची लढाई सर्वांनी एकत्र लढूया, नियमांचे काटेकोर पालन करुया - सोनिया गांधी title=

नवी दिल्ली : देशात सध्या कोरोनाचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकांने आपली आणि दुसऱ्यांची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे, असे आवाहन करताना कोरोनाविरुद्धची लढाई सर्वांनी एकत्र लढलायची आहे, असे प्रतिपादन काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केले. आज देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी १० वाजता संबोधित करणार आहेत. त्याआधीच सोनिया गांधी यांनी जनतेशी संवाद साधला आहे.

 यावेळी सोनिया गांधी म्हणाल्यात, कोरोनाविरोधातील लढाईत दिवसरात्र मेहनत करणाऱ्या डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस यांचे कौतुक आहे.  लॉकडाऊन तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करा, असे आवाहन सोनिया गांधी यांनी केले. याचा व्हिडीओ काँग्रेसकडून ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.

जगात कोरोनाचे संकट आहे. आपल्याही देशावर संकट आले आहे. या संकटावर मात केली पाहिजे. त्यासाठी आपण सर्वजण एकत्र मिळून करोनाची लढाई लढणे यापेक्षा मोठी देशभक्ती काय असू शकते. सुरक्षा उपकरणांची कमतरता असतानाही आपले योद्धा कोरोनाविरोधातील युद्ध लढत आहेत. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी स्वसंरक्षण ड्रेस नसतानाही रुग्णांवर उपचार करत आहेत, हे त्यांचे धाडक मोठे कौतुकास्पद आहे, असे त्या म्हणाल्यात.

कोरोनापासून आपल्याला सुटका हवी असेल तर प्रत्येकाने नियम पाळले पाहिजेत. लॉकडाऊनच्या काळात हे नियम पाळा. लॉकडाऊन आणि संचारबंदी काळात प्रत्येक नागरिकांनी घरात राहणे गरजेचे आहे. हे लॉकडाऊन यशस्वी व्हावे यासाठी पोलीस आणि जवान कर्तव्य निभावत आहेत. स्वच्छता कामगार अनेक सुविधा नसतानाही विषाणूंचा फैलाव रोखण्यासाठी मदत करत आहेत. सरकारी कर्मचारीदेखील महत्त्वाच्या सेवा सुरु राहाव्यात यासाठी मेहनत करत आहेत. पण जर आपण त्यांना पाठिंबा दिला नाही तर ते त्यांचं काम योग्य रितीने करु शकणार नाहीत, असे त्यांनी जनतेला संबोधित केले.

दरम्यान, देशात अनेक ठिकाणी डॉक्टरांवर हल्ले होत असल्याने नाराजी व्यक्त केली. डॉक्टरांवर हल्ला केल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत, हे चुकीचे आहे. ही आपली संस्कृती नाही. या लढाईत आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. अनेक नागरिक आपल्या परिने मदत करत आहेत. अनेकजण सॅनिटायझर, रेशनचं वाटप करत वैयक्तिक स्तरावर मदत करत आहात. तुम्ही सर्वजण कौतुकास पात्र आहात. आम्ही राज्यात सत्तेत असो किंवा विरोधात पण या लढाईत सर्व काँग्रेस कार्यकर्ते तुमच्यासोबत आहेत, असे त्या म्हणाल्यात.