तलावात बुडून ५ जणांचा मृत्यू

ऱायगडमधील खालापूर शिरवली येथे तलावात बुडून ५ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीये. मृतांमध्ये महिला तसेच मुलांचा समावेश आहे. 

Updated: Jun 7, 2017, 10:52 AM IST
तलावात बुडून ५ जणांचा मृत्यू title=

रायगड : ऱायगडमधील खालापूर शिरवली येथे तलावात बुडून ५ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीये. मृतांमध्ये महिला तसेच मुलांचा समावेश आहे. 

तलावावर कपडे धुण्यासाठी तसेच आंघोळीसाठी गेले होते. यावेळी या ५ जणांचा तलावात बुडून मृत्यू झाला. 

मीनाक्षी वाकनिस(31), शुभम मिलिंद वाकनिस(८), गौरी गणेश आरते(33), तेजस्वीनी गणेश आरते(10), तुषार गणेश आरते(7) अशी मृतांची नावे आहेत. हे सर्व शिरवलीमधील निवासी होते.