शिवसेना फक्त श्रीनिवास वनगांंचा वापर करतेय - मुख्यमंत्र्यांंची टीका

श्रीनिवास वनगा यांचा शिवसेना फक्त वापर करतेय, त्यांचा पराभव झाला की मातोश्रीची दारं त्यांनी कायमची बंद होतील, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. पालघर पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांची आज नालासोपाऱ्यात सभा झाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

Updated: May 20, 2018, 07:57 PM IST
शिवसेना फक्त श्रीनिवास वनगांंचा वापर करतेय - मुख्यमंत्र्यांंची टीका  title=

 पालघर : श्रीनिवास वनगा यांचा शिवसेना फक्त वापर करतेय, त्यांचा पराभव झाला की मातोश्रीची दारं त्यांनी कायमची बंद होतील, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. पालघर पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांची आज नालासोपाऱ्यात सभा झाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

गेल्या तीन वर्षांत भाजप सरकारनं पालघर जिल्ह्यात भरीव कामगिरी केल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला आहे. तसंच चिंतामण वनगा यांचं अपूर्ण काम पुरं करायचंय, त्यासाठी कटिबद्ध असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. 

  भाजपाविरोधात तक्रार  

भाजपकडून कुठेही आणि कोणत्याही प्रचार साहित्यावर माझ्या पतीचे फोटो किंवा नाव वापरले व छापले जाऊ नयेत, अशी सक्त ताकीद द्यावी. अन्यथा मला न्यायालयात जाऊन दाद मागावी लागेल, असा इशाराही जयश्री वनगा यांनी दिला आहे.