हातभट्टीपेक्षा रम चांगली!

 दलित तरुणांनी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समध्ये जावं, असा सल्ला आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी दिला आहे.

Updated: Oct 1, 2017, 04:30 PM IST
हातभट्टीपेक्षा रम चांगली! title=

पुणे : दलित तरुणांनी आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समध्ये जावं, असा सल्ला आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी दिला आहे. सैन्यात गेल्यामुळे चांगलं खायला आणि प्यायला मिळतं. शरीर धट्टकट्ट होतं. तसंच हातभट्टीची पिण्यापेक्षा रम चांगली, असं रामदास आठवले म्हणालेत.

आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समध्ये आरक्षण मिळावं ही आमची मागणी कायम आहे, अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली आहे.