सांगलीत सद्भावना रॅलीला सुरूवात

जिल्हा प्रशासनातर्फे सांगलीत नुकतीच सद्भावना रॅलीला सुरूवात करण्यात आली आहे. या सद्भावना रॅलीत राजकीय पक्षांनी सहभागी होऊ नये असं आवाहन, भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केल होतं. 

Updated: Jan 14, 2018, 09:11 AM IST
 सांगलीत सद्भावना रॅलीला सुरूवात  title=

सांगली : जिल्हा प्रशासनातर्फे सांगलीत नुकतीच सद्भावना रॅलीला सुरूवात करण्यात आली आहे. या सद्भावना रॅलीत राजकीय पक्षांनी सहभागी होऊ नये असं आवाहन, भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केल होतं. 

सरकारवर टीका 

अनियंत्रित हिंदुत्ववादी संघटनांची वाढती ताकत देशाला परवडणारी नाही. निवडणुका जिंकण्यासाठी पाकिस्तान हाफिज सईदवर कारवाई करत नाही. त्याच प्रमाणे आपलं सरकारही अनियंत्रित हिंदुत्ववादी संघटनांवर कारवाई करत नाही अशी टीका, प्रकाश आंबेडकरांनी केली.

'कारवाई का नाही ?'

 सोशल मीडियात पंतप्रधानांवर टीका केली तर गुन्हा दाखल होतो. मग मुख्यमंत्र्यांना फेसबुकवर धमकी देणा-यांवर कारवाई का होत नाही ? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.