भायखळा जेल सुरक्षेचा प्रश्न गंभीर - मुंबई उच्च न्यायालय

भायखळा जेलमधील कैदी मंजुळा शेट्ये हिच्या मृत्यूनंतर जेलच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला असल्याचं मत मुंबई उच्च न्यायालयनं नोंदवलं आहे. 

Updated: Jun 30, 2017, 06:33 PM IST
भायखळा जेल सुरक्षेचा प्रश्न गंभीर - मुंबई उच्च न्यायालय title=

मुंबई : भायखळा जेलमधील कैदी मंजुळा शेट्ये हिच्या मृत्यूनंतर जेलच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला असल्याचं मत मुंबई उच्च न्यायालयनं नोंदवलं आहे. 

जेलच्या परिस्थितीबद्दल दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान कोर्टाने हे मत नोंदवलं आहे. 

राज्यभरातील जेलमध्ये कैद्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधांबद्दल हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. राज्यभरातील जेलमध्ये कैद्यांच्या संख्येच्या तुलनेत जागा अपूरी पडत असल्याचा मुद्दाही याचिकांमध्ये मांडल्यात आला आहे.