मुंबईत मुसळधार पावसानं घेतला तरूणीचा बळी

कालच्या मुसळधार पावसानं एका तरूणीचा बळी घेतला आहे. वसईच्या मैत्री शाह या १७ वर्षीय कॉलेज तरुणीचा लोकलमधून पाय घसरून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. काल संध्याकाळी कॉलेज आटोपून घरी परत येत असताना बोरीवली आणि दहीसर दरम्यान चालत्या लोकलमधून पाय घसरून खाली पडली आणि जागेवरच मृत्यू झाला आहे. तिचा मृत्यूदेह अजून ताब्यात मिळालेला नाही. 

Updated: Sep 20, 2017, 02:55 PM IST
मुंबईत मुसळधार पावसानं घेतला तरूणीचा बळी title=

मुंबई : कालच्या मुसळधार पावसानं एका तरूणीचा बळी घेतला आहे. वसईच्या मैत्री शाह या १७ वर्षीय कॉलेज तरुणीचा लोकलमधून पाय घसरून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. काल संध्याकाळी कॉलेज आटोपून घरी परत येत असताना बोरीवली आणि दहीसर दरम्यान चालत्या लोकलमधून पाय घसरून खाली पडली आणि जागेवरच मृत्यू झाला आहे. तिचा मृत्यूदेह अजून ताब्यात मिळालेला नाही. 

पावसाचा जोर मुंबईत आज सकाळपासून कमी झाला आहे. पण सकाळी ९ पासून दक्षिण मुंबईत पावसानं विश्रांती घेतली आहे. तर ठाणे ते दादर परिसरातही पावसाची रिमझिम सुरू आहे. लोकल सेवाही १० ते १५ मिनिटं उशिरानं धावणाऱ्या लोकलही आता काही प्रमाणात वेळवर धावत आहेत.

व्हिडिओ