BPCL ने गुपचूप वायुप्रवाह सुरू केल्याचा सेना आमदाराचा आरोप

Updated: Aug 10, 2018, 04:13 PM IST

दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई : BPCL कंपनीवर उद्या शिवसेना मोर्चा काढणार आहे. जोपर्यंत स्थानिकांच्या सुरक्षेबाबत व्यवस्थापन लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत कंपनीत काम पुन्हा सुरु करू देणार नाही, असा इशारा शिवसेनेनं बीपीसीएल व्यवस्थापनाला दिलाय. माहुल आणि आसपासचा परिसर काल रात्री पुन्हा मोठ्या आवाजानं हादरला. त्यामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे.

पुन्हा वायूप्रवाह सुरु ?

BPCL कंपनीनं पुन्हा वायूप्रवाह सुरु केल्याचा स्थानिक शिवसेना आमदार तुकाराम काते यांचा आरोप आहे. बुधवारी बीपीसीएल कंपनीत आग लागली होती.  
आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर काल रात्री BPCL कंपनीने गुपचूप पुन्हा वायू प्रवाह सुरु केल्याचा आमदार तुकाराम काते यांचा दावा आहे.