'एन्काऊंटर स्पेशालिस्ट' सामनातून योगी आदित्यनाथांवर टीका

कानपूर पोलीस हत्याकांडावर सवाल

Updated: Jul 6, 2020, 08:46 AM IST
'एन्काऊंटर स्पेशालिस्ट' सामनातून योगी आदित्यनाथांवर टीका  title=

मुंबई : कानपूर पोलीस हत्याकांडाने उत्तर प्रदेशातील 'एन्काऊंटर स्पेशालिस्ट' सरकारची पोलखोल केली आहे. या हत्याकांडाने ४० वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातच झालेल्या नथुआपूर पोलीस हत्यातांडाच्या दुःखद स्मृतींना उजाळा दिला आहे. ४० वर्षांनंतरही उत्तर प्रदेशात पोलिसांना गुंड अशा पद्धतीने मारू शकत असतील तर योगी महाराजांच्या उत्तर प्रदेशात बदलले काय? असा सवाल विचार शिवसेनेने 'सामना'तून योगी आदित्यनाथांवर टीका केली आहे. 

२ जुलै रोजी विकास दुबेच्या गुंडांक़डून आठ पोलिसांचे जे निर्घुण शिरकाण झाले. त्यामुळे देश हादरला आहे. या आठ पोलिसांत पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या एका अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. यानंतप विकास दुबे नेपाळमध्ये फरार होऊ शकतो असा संशय असल्याने उत्तर प्रदेश पोलिसांनी तेथील सीमा सील वगैरे केल्याच्या बातम्या आहेत. या पार्श्वभूमीवर उद्या विकास दुबे आपल्यासाठी 'नेपाळमधील दाऊद' ठरू नये म्हणजे मिळवले अशी भीतीही शिवसेनेने सामनातून व्यक्त केली आहे. 

काय म्हटलंय 'सामना' अग्रलेखात 

गुंड टोळ्या आणि त्यांच्या गुन्हेगारीमुळे उत्तर प्रदेशसारखे राज्य दशकानुदशके बदनाम राहिले आहे. विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमधील गुंडागर्दी संपुष्टात आणली असे दावे अनेकदा केले गेले. मात्र कानपूरमधील पोलीस हत्याकांडाने या दाव्यांवर भलेमोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 

२ जुलै रोजी विकास दुबेच्या गुंडांकडून आठ पोलिसांचे जे निर्घृण शिरकाण झाले, त्यामुळे देश हादरला आहे. या आठ पोलिसांत पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या एक अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. कानपूरमधील चौबेपूर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील बिकरू या गावात कुख्यात गुंड विकास दुबे याला पकडण्यासाठी हे पोलीस पथक गेले होते. मात्र दुबे आणि त्याच्या गुंडांनी या पथकावर अंदाधुंद गोळीबार केला. त्यात पोलीस उपअधीक्षक देवेंद्र मिश्रा यांच्यासह तीन पोलीस उपनिरीक्षक आणि चार कॉन्स्टेबल अशा आठ पोलिसांचा मृत्यू झाला. ज्या पद्धतीने दुबे आणि गुंडांकडून पोलिसांवर गोळीबार झाला, त्यावरून या कारवाईची ‘टिप’ दुबेला आधीच मिळाली असावी. किंबहुना, त्याच आरोपावरून चौबेपूर पोलीस ठाण्याचा प्रमुख विनय तिवारी याला आता निलंबित करण्यात आले आहे. त्याची चौकशीही सुरू आहे. त्यातून काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागतीलच, पण उत्तर प्रदेशातील गुंड-पोलीस ‘लागेबांधे’ कसे आहेत याचाच पुरावा या घटनेने दिला आहे,अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.