राज्याची स्थिती आभाळ फाटल्यासारखी - मुख्यमंत्री

राज्याची स्थिती आभाळ फाटल्यासारखी आहे, पण आम्ही ते शिवल्याशिवाय रहाणार नाही असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा राज्याची आर्थिक स्थिती बिकट असल्याचं मान्य केलं आहे. औरंगाबाद आणि पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी आज सह्याद्री अतिथीगृहात कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला. 

Updated: Jun 27, 2017, 04:45 PM IST
राज्याची स्थिती आभाळ फाटल्यासारखी - मुख्यमंत्री title=

मुंबई : राज्याची स्थिती आभाळ फाटल्यासारखी आहे, पण आम्ही ते शिवल्याशिवाय रहाणार नाही असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा राज्याची आर्थिक स्थिती बिकट असल्याचं मान्य केलं आहे. औरंगाबाद आणि पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी आज सह्याद्री अतिथीगृहात कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला. 

राज्याच्या अर्थविभागाने १५ हजार कोटींपर्यतच कर्जमाफी द्यावी, असा पवित्रा घेतला असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कर्जमाफी करण्याआधीच अर्थसंकल्पात ४००० कोटींची तूट आहे. मात्र तरीही पैसा उभा करू असा दावा त्यांनी केला आहे.