उद्धव ठाकरे नगरसेवकांच्या तक्रारी घेऊन वर्षा बंगल्यावर

नगरसेवकांना विकास निधी दिला जात नाही, अशी तक्रार घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारी 'वर्षा' या बंगल्यावर गेले होते. यावेळी उद्धव यांनी त्यांच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्या.

Updated: Aug 22, 2017, 11:00 PM IST
उद्धव ठाकरे नगरसेवकांच्या तक्रारी घेऊन वर्षा बंगल्यावर title=

मुंबई : नगरसेवकांना विकास निधी दिला जात नाही, अशी तक्रार घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारी 'वर्षा' या बंगल्यावर गेले होते. यावेळी उद्धव यांनी त्यांच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्या.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेना नगरसेवक आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, तसेच कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्तही यावेळी उपस्थित होते.

 कल्याण डोंबिवलीतल्या महापालिकेतील शिवसेना नगरसेवकांची मतदारसंघातली विकासकामं होत नाहीत. त्याचबरोबर नगरसेवकांना विकास निधी दिला जात नाही, अशी तक्रार होती. त्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची चर्चा केली.