सुपरस्टारची सफर...एक नजर

९ डिसेंबर १९४२ ला राजेश खन्नांचा अमृतसरला जन्म. जतीन खन्ना नाव. २४ व्या वर्षी म्हणजेच १९६६ ला आखिरी खत या चित्रपटातून कारकिर्दीला सुरूवात... त्यानंतर राज, बहारों के सपने, औरत के रुप असे सिनेमे केले पण १९६९ मध्ये आलेल्या आराधनाने खरे यश मिळवून दिले. त्यानंतर एकामागोमाग १४ सुपरहिट फिल्मस देण्याचा मान राजेश खन्नालाच जातो. त्यामुळंच ते हिंदे सिनेसृष्टीचे पहिले सुपरस्टार म्हणून ओळखले जातात.

Updated: Jul 18, 2012, 02:36 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

२९ डिसेंबर १९४२ ला राजेश खन्नांचा अमृतसरला जन्म. जतीन खन्ना नाव. २४  व्या वर्षी म्हणजेच १९६६ ला आखिरी खत या चित्रपटातून कारकिर्दीला सुरूवात...   त्यानंतर राज, बहारों के सपने, औरत के रुप  असे सिनेमे केले पण १९६९ मध्ये आलेल्या आराधनाने खरे यश मिळवून दिले.  त्यानंतर एकामागोमाग १४ सुपरहिट फिल्मस देण्याचा मान राजेश खन्नालाच जातो. त्यामुळंच ते हिंदे सिनेसृष्टीचे पहिले सुपरस्टार म्हणून ओळखले जातात.

 

 

१)  २९  डिसेंबर १९४२  ला जन्मलेले राजेश खन्ना शाळा कॉलेजच्या काळापासूनच अभिनय़ करत आलेत. त्यांना त्यांच्याच एका नातेवाईकानं दत्तक घेतलं होतं आणि पालनपोषण केलं होतं.

 

२)  राजेश खन्नानं चित्रपटांतून कामं मिळावित यासाठी अनेक निर्मात्यांच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवले. स्ट्रगलर असूनही
ते महागड्या कारमधून निर्मात्यांकडे जात. अशा कार्स तेव्हाच्या टॉप अभिनेत्यांकडेही नसायच्या.

 

३) एक स्पर्धा जिंकताच त्यांचा संघर्ष संपला आणि त्यांना राज या सिनेमासाठी साईन करण्यात आलं... जी पी सिप्पी यांच्या या सिनेमात तेव्हाची बबीतासारखी मोठी स्टार होती.

 

३)  मात्र राजेश खन्नाचा पहिला प्रदर्शित चित्रपट ठरला ‘आखिरी खत’ हा सिनेमा १९६७ मध्ये रिलीज झाला.

 

४)  १९६९ मध्ये रिलीज झालेल्या आराधना आणि दो रास्ते च्या यशानंतर राजेश खन्नानं मागे वळून पाहिलंच नाही. त्यांना थेट सुपरस्टार ही बिरुदावली प्रदान करण्यात आली आणि लोकप्रियतेच्या शिखरावर बसवण्यात आलं.

 

५) सुपरस्टारपदाच्या सिंहासनवर राजेश खन्ना फार काळ राहिले नाहीत मात्र त्यांना जितकी लोकप्रियता नंतर कोणालाही मिळाली नाही.

 

६)  तरुणींमध्ये तर राजेश खन्ना विशेष लोकप्रिय... असंही म्हटलं जातं की त्यांना मुलींनी रक्तानं पत्र लिहिली आहेत. त्यांच्या फोटोशीच लग्नही केलं. हातावर पायांवर राजेश खन्नाचं नावही गोंदवून घेतलं.त्यांचा फोटो उशाशी घेऊन तरुणी झोपायच्या.

 

७) असंही म्हणतात की एखाद्या स्टुडिओ किंवा निर्मात्याच्या ऑफिसबाहेर राजेश खन्नाची सफेद कार दिसली तर मुली त्या कारलाच किस करायच्या त्यांच्या लिपस्टिकच्या रंगानं कारचा रंगच गुलाबी  व्हायचा.

 

८) निर्माता दिग्दर्शक राजेश खन्नाच्या घराबाहेर रांग लावून उभे राहात आणि मागेल त्या मानधनावर त्यांना साईन करत.

 

९)  एक आढवण अशी सांगितली जाते की पाईल्सच्या ऑपरेशनसाठी राजेश खन्नाला हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलं होतं तेव्हा निर्मात्यांनी त्यांच्या रुमजवळी दुस-या रुम्स बुक केल्या कारण संधी मिळताच राजेशला आपल्या सिनेमाची कथा ऐकवता येईल.

 

१० )  राजेश खन्ना विशेष लोकप्रिय ठरले ते रोमॅण्टिक हिरो म्हणून... त्यांची डोळे मिचकावण्याची, मान तिरकी करून बोलण्याची लकब लोकांना विशेष भावली.

 

११)  राजेश खन्नाने वापरेलेले कुर्ते खास प्रसिद्ध होते. लोकांनीही तसेच कुर्ते वापरायला सुरुवातही केली होती.

 

१२) आराधना, सच्चा झूठा, कटी पतंग, हाथी मेरे साथी, मेहबूब की मेहंदी, आनंद, आन मिलो सजना, आपकी कसम सारख्या चित्रपटांनी उत्पन्नाचे नवे रेकॉर्डस प्रस्थापित केले.

 

१३ ) आराधना मधील मेरे सपनों की रानी कब आएगी तू... हे गाणं त्यांच्या करिअरचं सर्वाधिक हीट गाणं ठरलं.

 

१४)  तर आनंद हा सिनेमा सर्वोत्कृष्ट सिनेमा मानला जातो. यात त्यांनी कॅन्सरग्रस्त युवकाची भूमिका साकारली होती.

 

१५)  राजेश खन्नाच्या यशामागे संगीतकार आर डी बर्मन आणि गायक किशोर कुमार यांचं मोलाचं योगदान आहे....या त्रयींची अनेक गाणी हीट झाली आहेत... किशोरनं ९१ चित्रपटांमधून राजेशला आवाज दिलाय तर आर डी बर्मन यांनी त्यांच्या ४० सिनेमांना संगीत दिलंय.

 

१६) आपल्या सिनेमांच्या संगीताबाबत ते नेहमी सतर्क राहायचे. गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी ते नेहमी स्टुडिओत हजर असायचे आणि आपल्या सुचना संगीत दिग्दर्शकांकडे नोंदवायचे.

 

१७) मुमताज आणि शर्मिला टागोर बरोबरची त्यांची जोडी विशेष गाजली. मुमताज सह तर त्यांनी ८  हीट सिनेमे दिले.

 

१८) मुमताजनं लग्न करून चित्रपटसृष्टीतून घेतलेला संन्यास त्यांना फारसा रुचला नाही.

 

१९)  शर्मिल