कृषिमंत्री राधाकृष्ण विखेंचा अजितदादांवर हल्लाबोल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हल्लाबोल केला आहे. `सिंचनावर ७ हजार कोटी रुपये खर्चून काय उपयोग झाला.`

Updated: Mar 29, 2013, 08:11 PM IST

www.24taas.com, लातूर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हल्लाबोल केला आहे. `सिंचनावर ७ हजार कोटी रुपये खर्चून काय उपयोग झाला, राज्यातली जनता मात्र पाण्यासाठी तडफडत असल्याची टीका त्यांनी केली आहे.`
`याचं आपण आत्मपरीक्षण करणार काय?` असा रोकडा सवाल त्यांनी अजित पवारांना विचारला आहे. धरणं शेतक-यांसाठी की कंत्राटदरांसाठी असंही त्यांनी म्हटलं आहे.
या निमित्तानं नव्या वादाला तोंड फुटलं असून, दुष्काळावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीत कलगीतुरा रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.