भूकंपाची टांगती तलवार....

भूकंप या एका शब्दातच सगळं काही दडलंय. निसर्गाचं हे एक अक्राळ विक्राळ असं रुप आहे. भूकंपापुढं धरतीही थरारल्या शिवाय राहात नाही. हेच रुप इंडोनेशियातील नागरिकांना बुधवारी दुपारी पुन्हा एकदा पहायला मिळालंय.

Updated: Apr 11, 2012, 11:14 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

पुन्हा थरारली धरती !

भूकंपाने  हादरलं इंडोनेशिया !

त्सुनामीच्या भीतीने गारठले २८ देश !

काय दडलंय पृथ्वीच्या पोटात ?

भूकंपाची टांगती तलवार

 

भूकंप या एका शब्दातच सगळं काही दडलंय. निसर्गाचं हे  एक अक्राळ विक्राळ असं रुप आहे. भूकंपापुढं  धरतीही  थरारल्या शिवाय राहात नाही. हेच रुप इंडोनेशियातील नागरिकांना बुधवारी दुपारी पुन्हा एकदा पहायला मिळालंय. भूकंपाच्या धक्क्यांमुळे  बुधवारी इंडोनेशिया  अक्षरश: हादरुन गेला. त्या भूकंपाची तीव्रता ८.७ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचे धक्के बसताच  इंडोनेशियातील  नागरिक रस्त्यावर आले. घर, कार्यालय, मॉल्समधून लोक जीव वाचविण्यासाठी बाहेर पळत सुटले होते. भेदरलेल्या अवस्थेत लोक रस्त्यावर  आले होते.

 

प्रत्येकाला आपल्या आप्तस्वकियांची चिंता सतावत होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भूकंपाची भीती दिसत होती. भूकंपामुळे संपूर्ण इंडोनेशियात जणू आणिबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. या भूकंपाचा केंद्र बिंदू असेह प्रांताची राजधानी बांदापासून ४९५ किलोमीटरवर समुद्रात ३३ किलोमीटर खोलीवर होता. हा भूकंप बँकॉकमध्येही जाणवला. तिथंही लोक रस्त्यावर आले होते. भूकंपानंतर सर्वत्र सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. तसेच  भारत, श्रीलंका, म्यानमार, थाईलँड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, सिंगापूर, मलेशिया, मालदीव, इराण, बांग्लादेश, येमन, युनायटेड किंगडम या देशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. कारण या भूकंपामुळे सुनामीची भीती व्यक्त केली जात होती.

 

समुद्र किनाऱ्यावर असलेल्या भारतातील शहरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. मात्र नंतर तो मागे घेण्यात आला. इंडोनिशेयापासून जवळच असलेल्या अंदमान निकोबार बेटांवरही सुनामीचा इशारा देण्यात आला होता. कारण २००४ मध्ये आलेल्या सुनामीमुळे अंदमान निकोबारला मोठा तडाखा बसला होता. त्यामुळे बुधवारी इंडोनेशियात भूकंप झाल्याचं समजताच या परिसरातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. इंडोनेशियात भूकंप येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही इथ भूकंपाने अनेक धक्के दिले आहेत. कारण फॉल्टलाईनच्या मुखावर इंडोनेशिया वसलेलं आहे. त्यामुळे हा भूभाग कायमच ज्वालामुखी आणि भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो आहे.

 

अनेक बेटांचा मिळून इंडोनेशिया एक देश बनला आहे. इंडोनेशियात यापूर्वी डिसेंबर २००४ मध्ये आलेल्या भूकंपाची तीव्रता ९.१ रिश्टर स्केल इतकी होती. त्या भूकंपात मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली होती. बुधवारी आलेल्या या भूकंपामुळे पुन्हा एकदा इंडोनेशियाला हादरा दिला आहे. इंडोनिशेयात आलेल्या भूकंपाचे धक्के भारतातही जाणवले आहेत. विशेषता पश्चिम बंगाल, बिहार, तमिळनाडू, ओरीसा या राज्यातील लोकांनी त्या झटक्यांचा अनुभव घेतला आहे. भारताला त्सुनामीचा धोका नसला तरी भूकंपाची टांगती तलवार कायम आहे. इंडोनेशियात भूकंप झाला असला तरी  त्याचे झटके मात्र भारतातही जाणवले. पश्चिम बंगाल, बिहार, तमिळनाडू, ओरीसा या राज्यात  भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरिक रस्त्यावर आले होते.

 

भूकंपामुळे काही ठिकाणी भिंतीला तडे गेले आहेत. भारतात त्याची तीव्रता कमी असली तरी नागरिंकमध्ये मोठी घबराट पसरली होती. सुनामी येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती. तसा इशाराही देण्यात आला होता. विशेषत: पूर्व समुद्र किनार पट्टीवरील रहिवाशांसाठी रेड अलर्ट जारी  करण्यात आला होता. मात्र नंतर तो मागे घेण्यात आला. मुंबईतही भूकंपाचे धक्के जाणवल्याचा दावा नागरिकांनी केला. मात्र हवामान खात्याच्या विभागाने तो दावा फेटाळून लावला आहे. गोव्यात मात्र भूकंपाचे धक्के जाणवले असून  मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा  इशारा देण्यात आला. गोवा हा पश्चिम किनार पट्टीवर असल्यामुळं पूर्व किनार पट्टीच्या तुलनेत या परिसराला क