रेल्वेरूळ ओलांडतांना ५ ठार

पाटणाच्या राजेंद्रनगर टर्मिनल रेल्वे स्टेशनजवळ रेल्वेखाली येऊन ५ लोकांचा मृत्यू झाला आहे, ही घटना बुधवारी रात्री ९ वाजता घडली. 

Updated: Aug 27, 2015, 09:44 AM IST
रेल्वेरूळ ओलांडतांना ५ ठार title=

पाटणा : पाटणाच्या राजेंद्रनगर टर्मिनल रेल्वे स्टेशनजवळ रेल्वेखाली येऊन ५ लोकांचा मृत्यू झाला आहे, ही घटना बुधवारी रात्री ९ वाजता घडली. 

पाटणाहून इस्लामपूर जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेनच्या घडकेत ५ लोकांचा मृत्यू झाला आहे. रेल्वेरूळ ओलांडतांना या ५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सर्व प्रौढ व्यक्ती आहेत. मृत व्यक्ती या मध्यमवर्गीय कुटुंबातून आहेत, यात तीन महिलांचाही समावेश आहे.

फूट ब्रीज नसल्याने रेल्वे रूळ ओलांडावा लागतो आणि असे अपघाता घडतात म्हणून या अपघाताला रेल्वेचं जबाबदार असल्याचं प्रवाशांनी म्हटलं आहे, अपघातानंतर प्रवाशांनी जोरदार घोषणाबाजी केली.

रेल्वे रूळ ओलांडतांना होणाऱ्या अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे, मुंबईत लोकलखाली येऊन मृत्यू पावणाऱ्यांची संख्या मोठी आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.